Skip to main content

Posts

Showing posts from November 26, 2018

हूल की भूल? Was published in Maharashtra Times, Nashik, 18 Nov 2018

"हूल" की "भूल"? परवा भारतीय क्रिकेटमध्ये असा एक गम्मतीशिर किस्सा घडला की ज्यामुळे सध्या क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे. C K नायडू स्पर्धेत (२३ वर्षा खालील खेळाडू) उत्तर प्रदेश आणि बंगालच्या सामन्यात उत्तर प्रदेश चा फिरकीपटू शिवा सिंह गोलंदाजी करायला आला. त्यानी सुरुवात उजव्या हाताची एक्शन करून केली, मात्र बॉल टाकायच्या आधी पूर्ण 360 अंश फिरून शेवटी डाव्या हाताने बॉल टाकला. अंपायर ने तो बॉल डेड घोषित केला. जर फलंदाज "स्विच हिट " किंवा "रिवर्स स्वीप" करू शकतात तर गोलंदाजीमध्ये असे का नाही होऊ शकत ह्या विषयावर चर्चा, मत प्रदर्शन सुरू आहेत. बघुया ICC ह्यातून काही बोध घेऊन नियमांमध्ये बदल करते का ते. तूर्तास तरी गोलंदाजाचा हा "हूल" द्यायचा प्रयत्न फसला आहे. मात्र, १९८१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूज़ीलैंड मधील एक दिवसीय सामन्यात ट्रेवर चपल चा "अंडर आर्म" बॉल हा न्यूज़ीलैंड च्या ब्रायन मैकेंची ला "हूल" देण्यात यशस्वी झाला होता. सध्या "हूल" बाबतीत ICC तसे कठोर दिसतय, कारण एखाद्या फील्डर ने फिल्डिंग करतांना थ्रो ...

बहोत कुछ कर दिखाया है..

"बहोत कुछ कर दिखाया है " ऑक्टोबर 2014 - दिवाळीच्या फराळाचे आस्वाद घेत संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी चर्चा रंगत होत्या. नुकताच जनतेने कौल दिला होता, अपेक्षीत असा नसल्यामुळे एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अफवा पसरल्या जात होत्या. युती, मुख्यमंत्री, खाते वाटप या गोष्टींवर खलबते, चर्चा रंगल्या होत्या. किंबहुना रंगवल्या जात होत्या. सम्पूर्ण देशाचेच नव्हे तर विदेशी मीडिया सुद्धा महाराष्ट्राकडे डोळे लावुन होते. अखेर 27 ऑक्टोबर 2014 उजाडले, एक नवीन, तेजस्वी, स्वच्छ पहाट घेऊन. होय. ह्याच दिवशी भाजपा मधील मान्यवरांच्या बैठकीत एक अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला -  युवा, अभ्यासू, स्वच्छ, धड़ाडी , मनमिळावू आणि कामगिरी "oriented" असलेल्या श्री देवेंद्र गंगाधर राव फडणवीस ह्यांना महाराष्ट्राच्या अठराव्या मुख्यमंत्री पदी घोषित केले गेले. ज्येष्ठांनी "राजकारण' डावलून" कामगिरी" ला प्राथमिकता दिली. दिवाळी च्या फराळाची चव अजूनच गोडावली. सम्पूर्ण महाराष्ट्रात एकीकडे आशेचे, नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले. तर दुसरीकडे काही संभ्रमात होते, कारण त्यांना अ...

टार्गेट डबल सेंचुरी

टार्गेट "डबल सेंचुरी" .. आपल्या महाराष्ट्र राज्यात फडणवीस सरकारने गेल्या चार वर्षात साधारणपणे सर्वच स्तरांवर अपेक्षित कारभार केला आहे. सर्वसाधारणपणे राज्यात स्थिर वातावरण आहे, आणि जनता आशावादी आहे. राज्यात एक पुरोगामी आणि स्वच्छ सरकार असल्याचा समाधानाचे वातावरण आहे. आता नजर आहे पुढच्या "टर्म" वर. वन डे क्रिकेट मध्ये ज्याप्रमाणे शेवटची दहा षटके महत्वाची असतात त्याचप्रमाणे कुठल्याही राज्य सरकार ला पाचवे / शेवटचे वर्ष अत्यंत जिकरीचे आणि करामतीचे असते. राजकारणात एक वर्ष हा तसा फार मोठा काळ असतो, आणि ह्या निवडणुकीच्या वर्षात बरेच आप्तेष्ट नाराज असतात, तर काही बाहेरचे आपल्या घरात येण्याची संधी बघत असतात (किंवा काही घरच्यांना पुढच्या दृष्टीने फिल्डिंग लावण्यासाठी काही बाहेरचे "मित्र" हवे असतात) , त्यामुळे ह्या एका वर्षात नेत्यांच्या "इनकमिंग - आउटगोइंग" ला उत येतो. भरीस राज्य कारभार, कायदा व्यवस्था, पाणी पुरवठा, इंधन / तेल किमती आणि महागाई  आपल्याकडे नजर लावूनच असतात. ह्यातील इंधन किमती परदेशी चलनाशी संबंधित असल्याने राज्य सरकार फार काही करू...

आणी बिगुल वाजले

" आणि बिगुल वाजले ..." भाजप+ शिवसेना सरकारने पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलय. बघायला गेले तर, स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त दोन वेळा एखाद्या तत्कालीन मुख्यमंत्र्याने सम्पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला, श्री वसंतराव नाईक (दोनदा, 1963-67,1967-72)आणि श्री विलासराव देशमुख (2004-8). आता ही संधी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना उपलब्ध आहे. सद्यपरिस्थितीत ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील असे चित्र आहे. परंतु, राजकारणात गोष्टी गृहीत धरणे हा अक्षम्य गुन्हा आहे. कधी कधी एका दिवसात उलथापालथ होते. मा मुख्यमंत्री आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी ही वास्तविकता नक्कीच जाणुन आहेत / असावेत. ह्याच अनुषंगाने आता "posturing" किंवा "पवित्रा घेणे" सुरू झाले आहे. नुकत्याच एका समारंभात मुख्यमंत्री म्हणाले कि त्यांना युती टिकवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढण्यात स्वारस्य आहे. लोकसभेच्या निवडणुकी साठी त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, तर विधानसभेसाठी एकत्र चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र ह्याच वेळी ते "आम्ही एकटे लढण्यास आणि जिंकून येण्यास समर्थ आहोत...

खेळ मांडला

"खेळ मांडला " नवीन आणि युवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप प्रणित भारतीय युवा मोर्चाने सम्पूर्ण महाराष्ट्रात, सगळ्या २८८ विधानसभा मतदार संघात खेळ आणि कला ह्यांचा मिलाफ करून "CM चषक" चे आयोजन केले आहे. क्रिकेट, खोखो, कबड्डी, वॉलीबॉल, कॅरम, कुस्ती, एथलेटिक्स चे खेळ रंगणार आहेत. ह्याच सोबत, रांगोळी, चित्रकला, गायन आणि नृत्य स्पर्धांचे सुद्धा ह्या "खेलात" समावेश आहे. आधी तालुका/ जिल्हा स्तरावर, आणि नंतर जिल्हा अंतर्गत चुरशी मुंबई आणि इतर शहरात रंगणार आहेत. जवळपास 40-50 लाख तरुण /तरुणी ह्यात सहभागी होतील, आणि त्यातील काही मतदार पक्षासोबत जुड़तिल अशी "खिलाडू" कल्पना / आशा ह्यामागे असावी. असो, राज्यातील बच्चे, नवतरुण आणि तरुण गटाला खेळ आणि कला सादरीकरणाची एक छान संधी आहे. एका परीने पक्षाच्या "नियोजन ", "संघटन"   "शिस्तबद्ध अंमलबजावणी" आणि "प्रसिसद्धीची" कसोटी हे खेळ लावतील. देशात आणि राज्यात पुढच्या वर्षी होणार्‍या निवडणुकांसाठी, पक्षाच्या "आयोजन आणि नियोजन" शक्तीचे एक ...

यत्र तत्र सर्वत्र

"यत्र तत्र सर्वत्र" साल २००५ मध्ये कौटुंबिक "विभक्ति (separation)" च्या दोन घटना ठळकपणे लक्षात राहतात. कधी कुणी विभक्त होतील यावर कुणालाही विश्वास न बसेल अश्या दोन सुप्रसिद्ध कुटुंबांना दुखद "विभक्ति" ला सामोरे जावे लागले. ह्यातील एक कुटुंब राजकारणातील तर दुसरे व्यापार जगतातील. अर्थात "राजकीय विभक्ति" ही यशस्वी झाली की नाही यावर अनेक मत-मतांतरे असू शकतात. पण आपण व्यापार जगतातील घटना बघुया. दोन भाऊ विभक्त झालेत. दोघांना मोठ-मोठ्या कंपन्याचे समूह मिळालेत. एका भावाने ज्या व्यवसायात आहोत त्यावरच लक्ष केंद्रित केले, आणि भरमसाठ प्रगती केली. त्याचा व्यापार समूह आज एवढा मोठा झाला की कुठलीही नवीन किंवा "अडकलेली" कंपनी त्याच्या कडे आशेने बघते. दुसर्‍या भावाने मात्र, "फास्ट आणि everything" हे सूत्र वापरले. ज्या व्यवसायामध्ये प्रावीण्य नाही अश्या व्यवसायात सुद्धा त्याने उडी घेतली. पॉवर जनरेशन, टेलीकॉम, इंफ्रास्ट्रक्चर अश्या "मेगा" भांडवल प्रणित क्षेत्रात त्याने निवडले (diversification केले). आज 12-13 वर्षानंतर अशी परि...

कास की ताडोबा?

कास की ताडोबा .... सातारा जिल्ह्य़ातले जैववैविध्याने नटलेले ठिकाण म्हणजे "कास" पठार. सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरले आहे.  कासचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर कासकडे पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढला. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. मार्च महिन्यात फक्त १५ दिवसांच्या कालावधीत यास पांढऱ्या रंगांची फुलं लाल पाकळ्यांसह गुच्छागुच्छाने आलेली दिसतात. पण कास पुष्प पठाराचे खरे सौंदर्य फुलते ते सप्टेंबर महिन्यात. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती असलेले पुष्प पठार आहे. इथे सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पठारावर रंगीबेरंगी फुलांचे पट्टे बहरू लागतात. निळ्या, जांभळय़ा, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगांच्या फुलांची आरास...
नमस्कार मित्रहो आपण खुशहाल आहात अशी आशा करतो. माझे नाव धनंजय देशमुख आहे, सध्या मी मुंबई ला राहतो. मी मूळचा अमरावती चा. 18+ वर्षा पासुन मी मार्केट रिसर्च क्षेत्रात कार्यरत आहे. मी पूर्णवेळ लेखक किंवा पत्रकार नाहिये. मार्केट रिसर्च आणि consulting हा माझा मूळ पेशा आहे / होता. एक नागरिक म्हणा किंवा आकलन करण्याची सवय म्हणा, मी देशातील व राज्यातील सद्द परिस्तिथी वर  लेख़ किंवा write up post करणार आहे (मराठी  हिंदी आणि इंग्रजी) . ह्याशिवाय खेळ, व्यापार जगत आणि टेक्नोलॉजी ह्या विषयक सुद्धा आवड आहे प्रामाणिक प्रयत्न केलाय, वेळ मिळाला तर वाचा आणि नक्की कळवा आपला अभिप्राय, धन्यवाद. माझा हा ब्लॉग आपण Subscribe केल्यास नवीन लेखांबद्दल आपल्याला नोटिफिकेशन येईल. धनंजय मधुकरराव देशमुख dhan1011@gmail.com https://www.linkedin.com/in/dhananjay-deshmukh-78ab107 ---- Hello Friends  I hope you are well. I am starting this blog to share my views / ideas on current situation in India and Maharashtra in particular. My interests are Sports, current affairs, business...