Skip to main content

Posts

बीत गई सो बात गई

30 मे 20, मुंबई बीत गई सो बात गई. क्रिकेटचा सामना रंगलाय. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटाच्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. वातावरण आभाळी आहे, पण मध्येच सूर्य प्रखरपणे डोकावून जातो. हवा सुद्धा नेहमीपेक्षा थोडी जास्त आहे. पीच वरील गवत अजूनही जिवंत आहे. साठ षटके झाल्यामुळे बॉल थोडा जुना झाला आहे, परंतु एखाद्या मुरलेल्या स्विंग गोलंदाजाला रिवर्स स्विंग टाकायला एकदम पोषक परिस्थिती. हा गोलंदाज, फलंदाजाचा कधी घसा कापला जाईल, तर त्याच्या कधी मानेला फटका बसेल असे बाऊन्सर फेकतो, तर, मध्येच रिवर्स स्विंग करून यॉर्कर टाकतो. फलंदाजांची पुरे पळापळ होते. काय करावे सुचत नाही. असो. टेस्ट क्रिकेट म्हंटले की गोलंदाज नजरेसमोर येतात. विशेषतः, ऐंशीच्या मध्यापासून ते नव्वदीच्या सुरवातीच्या काळातील वेगवान गोलंदाजी करणारे बरेच विंडीज, ऑस्ट्रेलियन, इंग्लिश, न्यूझिलॅण्ड आणि भारतीय गोलंदाज नजरेसमोर येतात, सोबत येते त्यांची शैली, खासियत. कुठलाही वेगवान गोलंदाज बाऊन्सर टाकण्यात पटाईत असतो. ते त्याचे अस्त्रच असते. परन्तु बाऊन्सर कोण टाकतो, यावर सुद्धा त्या बाऊन्सरची घातकता अवलंबून असते. उदाहरणार्थ,...

आपला रक्षणकर्ता, हाच आपला दुखहर्ता..

28 मे 20 आपला रक्षणकर्ता, हाच आपला दुखहर्ता. . कोरोना ने सगळीकडे हाहाकार केला आहे. महाराष्ट्रराज्य याच्या गर्तेतून सुटू शकले नाही. राज्यातील रुग्णांचा आकडा आज पन्नास हजारावर गेला आहे, समाजातील सगळ्याचा स्तरातील लोकांना, कमीअधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. काहींना आपले कर्त्तव्य बजावताना तर काहींना घरातून बाहेर ना पडल्यावरही कोरोनाची लागण झाली. ज्यांना आपण आपली, "फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस" असे म्हणतो, कोरोनायोद्धा असे म्हणतो, ते डॉक्टर्स, परिचारिका, साफसफाई कर्मचारी यांच्यासोबतच अनेक पोलीसकर्मी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले. काही बातम्यांची दखल घेतली तर, राज्यात आजघडीला एक हजारावर पोलिस अधिकारी कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील 22 अधिकाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. काल दिवसभरात दोनशेहून अधिक अधिकारी कोरोना बाधित झाल्याची बातमी आहे. पोलीस हे जनतेच्या सुरक्षेची पहिलीकडी आहेत. सामान्य जनता त्यांना आपल्या सुरक्षेची हमी समजतात. गेल्या काही महिन्यांत, राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले झालेत, दगडफेक झाली. मुंबईतील एक तरुण पोलीस अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न ...

अपेक्षांचे ओझे की कर्तव्य बजावण्याची सोनेरी संधी?

26 मे 20, मुंबई अपेक्षांचे ओझे की कर्तव्य बजावण्याची सोनेरी संधी? महाभारतात अनेक प्रसंग आहेत जेव्हा, भगवान श्रीकृष्णा ने पार्थ, अर्जुनाला आपले कर्तव्य बजावण्याची सूचना केली, कधी सल्ला दिला आणि नंतर परखडपणे समजावीले. हे सर्वश्रुतच आहे. आपली संस्कृती आहे. इतिहास आहे.त्यांनी दिलेली कर्तव्य बजावण्याची शिकवण आजसुद्धा आपण आपल्या विचारसरणीत आणल्या आहेत, अनुसरण करीत आहोत. येणार्‍या पिढीच्या मध्ये ही शिकवण संस्कारातून बिंबविण्यासाठी आपण प्रयत्नरत असतो. इतिहासातील अनेक युद्धप्रसंग किंवा अटीतटीचे प्रसंग आपण वाचले तर आपल्याला असे जाणवेल की ते योद्धे कार्मिक भावनेतून आपले कर्तव्य आपल्या शक्ति आणि बुद्धीने प्रामाणिकपणे बजावीत होते. यश, अपयश हा भाग वगळता, यातून त्यांची कर्तव्यपरायणता आपल्या समोर उदाहरणे म्हणुन उभी राहिल्यात. आपल्याला कठीण वेळी ही उदाहरणे मार्गदर्शित करीत असतात. प्रेरित करतात. आपण अनेकदा प्रस्थापित खेळाडू, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस किंवा आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या जिवनकथा वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा एक बाब ठळकपणे पुढे येते - ती प्रसंगाला निर्भ...

बदलना है जरूरी!

25 मे 20, मुंबई  बदलना है जरूरी.   कई सालो पहले विज्ञापन या फिल्म मे एक दृश्य देखा था. एक गाव से शहर जाकर पढ़-लिखकर एक लड़की नौकरी करने एक दूसरे गाव आती है. मुखिया को बच्चों के स्कूल के बारे मे पूछती है, तो जवाब मिलता हैं कि उस गाव मे स्कूल नहीं है, और गाव के लोग उनके छोटे बच्चों को शहर की स्कूल मे भेजना नहीं चाहते. तब वह लडकी कहती है, कि अगर हमारे बच्चे शहर के स्कूल मे नही जा सकते तो ना सही, स्कूल तो गाव मे आ सकता है. गाववालो की मदद से वो फिर एक छोटी स्कूल बनवाती है. बात डिलीवरी की है. बात है बदलाव की! मतितार्थ ये है कि, अगर कोई चीज़ दूर हो तो भी उसे पाने का तोड़ हम निकाल सकते हैं. अमूमन निकालते ही है.  नॉवेल कोरोना वायरस (कोवीड़-19) वैश्विक महामारी से दुनिया मे सभी जगह हाहाकार मचा है. पहले शायद यह अनुमान था कि शायद दो - चार महीनों में इसका असर कम हो जायेगा. ठीक वैसे ही जैसे सार्स, मर्स या एबोला का हुआ था. लेकिन लगता नहीं है कि कोवीड़-19 का प्रभाव इतने जल्दी कम होंगा. इस महामारी को फैलने से रोकने के लिए हमे हर उस कड़ी को तोड़ना होंगा जो ...

एवढा द्वेष का?

24 मे 20 एवढा द्वेष का?? कोरोना विषाणू ने जगामध्ये कहर घातला आहे. भारत त्याला अपवाद ठरू शकला नाही. देशभर, सगळ्यांच राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. काही राज्यांत मोठ्या प्रमाणात तर काही मध्ये कमी. जेथे रुग्ण कमी प्रमाणात आढळले तेथील बातमीदार/अधिकारी त्या वॉर्डचा किंवा जिल्ह्याचा किंवा राज्याचा "मॉडेल" जनतेत प्रस्तुत करीत आहेत. त्यात वावगे काहीच नाही. परंतु काही राज्यकर्ते असल्या तथाकथित "मॉडेल्स" चा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी करण्यात गुंग दिसतात. असो. महाराष्ट्रात कोरोना ची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुंबई मध्ये तर अजून भयावह परिस्थिती आहे. मुंबईचा आकडा रोज हजार - दीड हजाराने वाढतोय. महाराष्ट्रात पहिले रुग्ण 7 ते 10 मार्च दरम्यान पुण्यामध्ये आढळले. आज त्याला 70 दिवस झाले आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात अनेक कायदा व्यवस्था निगडित घटना घडल्यात. कोरोनाचा आकडा आटोक्यात येणे तर दूर, जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी राज्यात कार्यक्षम उपाययोजना दिसली नाही. प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या बातम्या आल्या. ...

आता तरी जागे व्हा

23 मे 20 अंगण आणि रणांगण. काल महाराष्ट्र भाजप च्या वतीने "महाराष्ट्र बचाओ" आंदोलन एका अभिनव पद्धतीने राज्यभरात राबविण्यात आले. राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते आणि समर्थक उत्साहात हे आंदोलन करतांना आढळले. सोशल मीडिया चा वापर चोखंदळपणे केला गेला. विशेष करून ट्विटर, फ़ेसबुक वर #MaharashtraBachao या हैशटॅग वर सकाळ पासूनच बरीच हालचाल होती. याला प्रत्युत्तर म्हणुन आघाडी सरकारने त्यांच्या काही नेत्यांना पुढे करून बरीच धावपळ केली. अर्थात त्यांच्या दिमतीला त्यांचे IT सेल, भाड्याने घेतलेली PR संस्था, आणि ट्रोलर्स चे टोळके होतेच. ढोबळ मानाने बघितले तर, घराच्या अंगणात आणि ऑनलाईन अश्या दुहेरी पद्धतीने केलेल आंदोलन जनतेच्या नजरेतून सुटू शकले नाही. काही टीव्ही चैनल्सनी त्याची दखल घेतली. काहींनी पाठ फिरवली. सोशल मीडिया वर काही पत्रकार परवापासूनच या आंदोलनाला कशी खीळ बसेल किंवा खिल्ली उडवून वातावरणनिर्मिती करीत होते. परंतु भाजप ने हे आंदोलन पूर्णत्वास केले. यशस्वी पणे केले. ही वस्तुस्थिती आहे. यशस्वी यासाठी की विद्यमान सरकारचे धोरण आणि त्यांची कामगिरी - ही राज...

तर.. प्रवाहाबाहेर फेकले जाऊ शकाल...

तर.. प्रवाहाबाहेर फेकले जाऊ शकाल... नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेना रिपाई महायुतीला ठोस बहुमत दिले. महायुतीच्या 165 जागा आल्यात, त्यात काही अपक्ष, बंडखोर आमदारांची सुद्धा भर पडू शकते, आणि हा आकडा 175-180 पर्यंत जाऊ शकतो. 2014 मध्ये सत्ता स्थापित झाल्यावर, दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे युतीचे संख्याबळ 185 झाले होते. तेव्हा या दोन संख्याबळामध्ये फार काही मोठा फरक नाही. संख्येचे दृष्टीने फार मोठा तोटा नाही. महायुती, देवेन्द्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभलेल्या सरकारची स्वच्छ कामगिरी, हिंदुत्व, आणि केंद्रातील विकासशील नेतृत्व घेऊन जनतेत गेली. लढली. 288 पैकी 175-180 मतदार संघात महायुतीच्या विचारधारेला बळ मिळाले. हिन्दुत्व हा मुद्दा अजून अधोरेखित झाला. भाजप आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वाचा भरभक्कम विचार संवर्धित करण्याच्या, आणि त्याला पुढे नेण्याच्या एकमतावर झालेली आहे. हिंदुत्व विचारधारेचा नैसर्गिक प्रवाह म्हणुन ही युती अबाधित राहिली आहे. तुटली, जुळली परंतु प्रवाह एकत्र राहिला. मोठा झाला. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी बहुतां...