Skip to main content

मावळत्या दिनकरा...

17 डिसेंबर 20, मुंबई

मावळत्या दिनकरा...
डिसेंबर अर्धा संपला, वर्ष मावळतीला आले! 2020 संपेल, दशकपूर्ती होणार!!
खरे तर 2020 हे वर्ष अनेकांना महत्त्वाचे होते. 2010 ते 2015 मध्ये अनेक मिशन, धोरणे 2020 च्या अनुषंगाने बनविलेली होती. 2019 पर्यंत राज्य आणि केंद्रातील सरकारांनी आपापल्या परीने प्रगतीच्या / धोरणांच्या जहाजाच्या सुकाणूला नियंत्रित केले (ढोबळमानाने जर पाहिलं तर सुकाणू म्हणजे जहाजाला दिशा देण्यासाठी ज्या गोल चाकासारख्या स्टेअरिंगचा वापर होतो, तो म्हणजे सुकाणूसुकाणू अगदी जहाजाच्या मध्यभागी असतो. सुकाणूमुळे विपरीत परिस्थिती अथवा गरजेनुसार जहाजाची दिशा बदलली जाते, प्रवाहापासून जहाजाची दिशा बदलण्यासाठी सुकाणूचा वापर होतो.).
 
2020 आले, मात्र वर्ष नुक्ते उजाडलेच होते, आणि संपूर्ण जगात कोरोना महामारीची सुनामी आली. आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण झाली, जागतिक बाजारपेठ मध्ये मंदी आली. मानव अंतर्मुख झाला. उद्योग, व्यापार, खेळ, मनोरंजन, पर्यटन सगळ्या क्षेत्रांना खीळ बसली. सगळी गणिते विस्कटली. गेल्या काही महिन्यांपासून उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा उभारी घेण्यास सुरुवात झाली आहे

2020 हे गॅप ईयर झाले. काही पाश्चिमात्य देशांत, ब्रिटन, अमेरिका मध्ये कोरोना वर मात करणारी लस देण्यास सुरुवात झाली आहे. भारतात सुद्धा तीन ते चार कंपन्या पुढच्या दोन तीन महिन्यात लस घेऊन येणार आहेत. एकदा लसीकरण सुरू झाले की, त्याचा जनतेच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणा सकारात्मक प्रभाव पडेल, "मेंटल इम्यूनिटी "वाढेल

तेव्हा येणारे नवीन वर्ष, 2021, हे मानवतेसाठी "पुनर्निर्माण वर्ष" ठरेल अशी आशा ठेवण्यास वाव आहे. अर्थात, येणार्या वर्षात अनेक बदल घडतील, काही गोड, काही कडू. कालचक्र आहे

दिल्लीतील वारे काय म्हणतात

दलालांना डावलून पाहिजे त्याला आपला शेतमाल विकून शेतकर्याला भरघोस भाव मिळावा या हेतूने केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन शेतकरी आंदोलन उभे करून पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय विरोधकानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापवलेले आहे. सामान्य शेतकर्याला डावलून या आंदोलनात CAA, कलम 370 ला विरोध करणारे धर्मांध, डावे आणि तुकडे तुकडे गँगचे बगलबच्चे उतरलेत. अर्थात त्यांचा वावर नसता तर आश्चर्य वाटले असते.

2018 च्या शेवटी सुद्धा कॉन्ग्रेस ने राफेल विमान खरेदीवरून अशीच राळ उठविली होती. मागच्या वर्षी नागरिकता कायद्याच्या (CAA) विरोधात दिल्ली आणि इतर अनेक शहरे पेटवली गेली होती, अराजकता फैलावणाचे प्रयत्न केले गेले. अर्थात दोन तीन महिन्यात ती आपसूक थंड झाली, त्यांचे खलिफा, आका, मात्र उघडे पडले. अनेकदा आपटून सुद्धा हे महाभाग सुधरत नाही याचा अर्थ, अजूनही त्यांची डोकी टणक आणि पोटे भरलेली आहे, जनतेत कुणी विचारीत नाही म्हणून दरवर्षी ते रस्त्यावर येतात हे मात्र खरे. कदाचित त्यांची हयात रस्त्यावरच जाईल असे दिसतेय

येणारे दशक भाजपाचे

पुढच्या वर्षी एप्रिल मे मध्ये पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 294 जागा असलेल्या विधानसभेत भाजपला किमान 150-170 जागा मिळतील अशी संभावना निर्माण झाली आहे. दिवसागणिक हा आकडा वाढेलच. राज्यात सध्या प्रचंड राजकिय संघर्ष सुरू आहे, एकप्रकारची वर्चुअल आणीबाणी निर्माण झाली आहे. राज्यात तृणमूल कॉंग्रेस ही तिहेरी संघर्षात अडकलेली दिसते - तृणमूल विरुद्ध भाजप, तृणमूल विरुद्ध एमआयएम आणि तृणमूल विरुद्ध कॉन्ग्रेस आणि डावे.

दुसरीकडे, येणार्या काळात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पंजाब इथे सुद्धा निवडणुका लागतील. तेलंगण राज्यातील भाग्यनगर/हैदराबाद येथील नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला जबरदस्त यश मिळाले. केरळ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपची लक्षणीय कामगिरी झाली आहे. थोडक्यात, पक्षाने आता दक्षिण भारतात पाया रचलेला आहे, येणार्या काळात दक्षिण भारतातून भाजपला मोठय़ा प्रमाणात लोकप्रतिनिधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमी वर भाजपला पंजाब मध्ये नवे मित्र, कार्यकर्ते लाभतील अशी संभावना निर्माण झाली आहे.

गर्जा महाराष्ट्र माझा.. 
कविवर्य राजा बढ़े यांनी आपल्या "जय जय महाराष्ट्र माझा" या स्फुरण गीतात महाराष्ट्राचे वर्णन, एक अत्यंत ताकतवर, निर्भीड आणि रुबाबदार राज्य असे केले आहे. आहेच तसे ते.
मात्र गेल्या वर्षभरात महाराष्ट्राची रया पुरती गेलेली दिसतेय. आधी राजकिय अस्थिरता निर्माण झाली, आणि राज्यावर नंतर कोरोना महामारीचे संकट आले, त्यात भरीस-भर राज्यात दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस असे नैसर्गिक आव्हाने आली. यातील कुठल्याही आव्हानाला, राज्य संपूर्ण शक्तीने पुढे गेल्याचे आढळत नाही. कारणे अनेक असतिल. राजकिय परिपक्वता. इच्छाशक्ति. आर्थिक परिस्थिती. प्रशासकीय अनुभव. अजून बरेच काही. पण, राज्यातील बारा कोटी जनतेचा बहुतांश वर्ग संपूर्ण वर्षभर त्रासलेला आहे - शेतकरी, काश्तकार, उद्योजक, कलाकार, खेळाडू, विद्यार्थी, गृहिणी, आणि व्यावसायिक.
 
राज्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन उद्योगांना आकर्षित करणे सुरू आहे, मात्र त्याला हवी तशी गती दिसत नाही. त्या तुलनेत, नवीन परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात उत्तर प्रदेश सारखे औद्योगिक दृष्ट्या मागासलेले राज्य पुढे जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. (वाचा -उत्तम ही नहीं, सफल भी )

राज्यात नवीन उद्योग आणणे म्हणजे त्याच त्या क्षेत्रात गुंतवणुक आणणे असे नव्हे. संपूर्णपणे नवीन इंडस्ट्री आणणे गरजेचे आहे. जसे, तैवान येथील सेमीकंडक्टर आणि integrated सर्किट (आईसी) मधील कंपन्यांना राज्यात गुंतवणूक करण्यास आकर्षित करणे. या पद्धतीच्या इंडस्ट्रीमुळे एक संपूर्ण नवीन उद्योग साखळी निर्माण होऊ शकते. (वाचा - Make Maharashtra Great Again! Economically.)

2021 मध्ये आपल्या राज्यात पुन्हा एकदा खुशाली नांदो ही अपेक्षा करूया.

राजकीय हवापालट.. 

एकीकडे राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात नवनवीन निचांक होत आहेत तर दुसरीकडे मात्र राजकिय वातावरण दिवसेंदिवस तापतय.

आघाडी सरकारने पहिली वर्षपूर्ती केली खरी, मात्र अनेकदा तिन्ही पक्षांमध्ये वादविवाद, समन्वयचा अभाव आणि मानापमान नाट्य रंगताना आढळले. दुसरीकडे भाजप मध्ये खरेच आलबेल आहे का? असा सवाल यायला काही घटना गेल्या वर्षभरात घडल्या, त्यांचे काही नेते पक्ष सोडून गेले. काल-परवा आघाडी सरकारच्या एका ज्येष्ठ नेत्याने, भाजपचे दहा आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले, मात्र हे सांगताना नेते , हे आमदार आजी की माजी हे नमूद करायला विसरले!

मध्यंतरी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. मे मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 9 पैकी 4 जागा मिळाल्या. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकीत 6 जागांपैकी भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. नागपूर आणि पुणे येथील परम्परागत जागा हातून निसटल्या. याची कारणमीमांसा झाली असेलच, मात्र काही नेत्यांनी कुठे उमेदवार निवडीत उशीर किंवा चूक झाल्याचे म्हंटले. काही ठिकाणी गटबाजी उफाळून आली का, किंवा, एकमेकांस हलके करण्याच्या नादात दोन जागा गमावल्या का असा प्रश्न अनेकांना पडला असावा. जरी उमेदवार एखाद्या गटाचा नसला तरीही, एकदिलाने काम होऊ शकले असते. पाडापाडीचे राजकारण करणार्यांना हे माहिती नसावे का, की या सगळ्या प्रकारात आपण नेतृत्वाच्या नजरेत येऊ? पक्ष नेतृत्वाला यातून बरेच काही शिकण्यासाठी मिळाले असेल. हार मध्ये जीत काय असते ते कालांतराने दिसेलच, कारण, "सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते" या तत्त्वाचे पालन करणारे अनेक आहेत. निवडणुका वेगळ्या असल्या तरीही, मैदान तेच आहेत - नागपूर आणि पुणे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच भागांत घमासान झाले होतेवर्ष झाले तरीही ते शमले किंवा काही मान्यवरांची दिलजमाई झाली हा गैरसमज आहे हेच यातून निष्पन्न होते. अर्थात, तीन पक्षांची आघाडी ही निर्णायक ठरू शकते हे सुद्धा यातून सिद्ध झाले.

2022 मध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील. त्याआधी कदाचित राज्यात मध्यावधि निवडणुका सुद्धा होऊ शकतात. या पार्श्वभुमीवर 2021 हे वर्ष महाराष्ट्रासाठी, राज्य भाजपासाठी, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फार महत्वाचे राहणार आहे.(वाचा - गारूड घातलया

या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळात काही बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, महाराष्ट्रातील काही नेत्यांची, विशेषतः भाजपच्या मुंबईतील तीन खासदारांपैकी कुणा एकाची वर्णी लागली तर आश्चर्य वाटायला नको.

जाता जाता.. 

लवकरच नवीन दशक सुरू होणार आहे. जुने ते जुने मानून पुढचा प्रवास सुरू ठेवायला हवा. दशक सुरू होणार तेव्हा अनेक आशा निर्माण होतात.
  • हे दशक भारताच्या आर्थिक प्रगतीचे आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्मितीचे होणार का?
  • भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची कधी होणार?
  • जम्मू आणि काश्मीर, लडाख भागात शांतता निर्माण होणार का? पाकिस्तान आणि चीनने बळकावलेले भूभाग, उदाहरणार्थ पाकिस्तान ऑक्पाईड जम्मू आणि काश्मीर (PoJK) परत भारतात विलीन होणार का?
  • देशामध्ये जनसंख्या नियमन कायदा, समान नागरी कायदा, नॅशनल सिटीझन रजिस्टर (NCR) लागू होणार का? उदारमतवादी मानसिकतेच्या नावाखाली कट्टरपंथी कटकारस्थान करणार्यांना हद्दपार केले जाणार का?
  • भारताला ऑलिंपिक स्पर्धेत सोनेरी कामगिरी करता येईल का?
  • विश्वगुरु होण्याचा ध्येयाने प्रेरित होऊन सुरू असलेले कार्य गतिशील होणार का?
  • उत्तर प्रदेश मधील प्रस्तावित फिल्मसिटी मुंबईतील फिल्मसिटी ला बाद करणार का?
  • मुंबईकरांना त्यांच्या हक्काची ३०० किलोमीटरची रेट्रो मिळणार का? मुंबईकर BMC मध्ये बदल घडवतील का ?
  • मुंबईला टोकियोसारखी अंडरग्राउंड सांडपाणी व्यवस्था मिळेल का ?

अर्थात मला जसे प्रश्न पडले तसेच दुसऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे, उदाहरणार्थ, "भावी" पंतप्रधान, आणि "भावी" मुख्यमंत्री यांची इच्छापूर्ति होणार का?

येणारे नवीन दशक हे देशासाठी आणि देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे हे मात्र खरे. जेव्हढी स्वप्ने मोठी, तेवढीच आव्हाने अवघड राहणार आहेत. या दशकातील शेवटच्या सहा वर्षांत मिळालेल्या निश्चायक नेतृत्वामुळे आणि राजकिय स्थैर्यामुळे , देशाची पुढील दशकातील वाटचाल यशस्वी होणार हा विश्वास निर्माण झाला आहे हे मात्र खरे.

नवीन वर्ष, नवीन दशक सुरू व्हायच्या आधी थोडे थांबून विचार करावयास हवा, मोकळा श्वास घेऊन येणार्या काळासाठी उत्साही राहूया. पंडित हरिवंशराय बच्चन यांनी म्हंटल्याप्रमाणे.. 

 जीवन की आपाधापी में कब वक्त मिला

कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोंच सकूँ,
जो किया, कहा, माना उसमें क्या बुरा भला।
कालाय तस्मै नमः
धनंजय मधुकर देशमुखमुंबई 
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषकआहेपोस्टमधील काही माहिती (फोटो, आकड़ेकविताइंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली.)

 

Comments

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...