5 जुलै 2021, मुंबई
दाणं उष्ट झालं जी..
एका लहान शेतकर्याची कथा. एक दिवस त्याचा एकमेव घोडा गाव सोडून पळून जातो. शेतकऱ्याचे शेजारी त्याचे सांत्वन करायला येतात आणि म्हणतात, "आपण खूप दुःखी असाल", शेतकरी, फार काही उत्तर देत नाही, फक्त म्हणतो "बघुया, काही दिवसात कळेल, चांगले झाले की वाईट".
काही दिवसांनी त्याचा घोडा परत येतो, आणि त्याच्या सोबत अजून दहा जंगली घोडे असतात. शेतकरी आणि त्याचा मुलगा सगळ्या घोड्यांना तबेल्यात ठेवतो. शेतकर्याचे शेजारी पुन्हा येतात, यावेळी म्हणतात, "वा, आपला घोडा तर जोरदार निघाला, अजून दहा घोडे घेऊन आला". शेतकरी निर्विकारपणे म्हणतो, "बघुया, काही दिवसात कळेल, चांगले झाले की वाईट".
दुसर्या दिवशी, जंगली घोड्यांपैकी एक घोडा शेतकर्याच्या मुलाला पायदळी तुडवतो, त्यात मुलाचा पाय तुटतो. पुन्हा शेजारी येतात, यावेळी सांत्वन करायला, पण शेतकरी नेहमी प्रमाणे उत्तर देतो, "बघुया, काही दिवसात कळेल, चांगले झाले की वाईट".
पुढे काही दिवसांनी, त्या राज्याच्या शेजारचा राजा त्यांच्यावर आक्रमण करतो, त्यामुळे त्याच्याशी युद्द करण्यासाठी राज्यातील सगळ्या तरुण मुलांना आणि घोड्यांना सैन्यात भरती होण्याचे आदेश येतात. शेतकऱ्याचे सगळे घोडे सैन्यात जातात, पण मुलगा घरी राहतो कारण जखमी असल्याने तो चालू शकत नसतो. शेतकऱ्याचे शेजारी पुन्हा येतात आणि शेतकर्याला हिणवतात, "तुमच्या मुलाला मैदान गाजवण्याची संधी होती, गेली ती". स्वभावाप्रमाणे, शेतकरी पुन्हा तेच उत्तर देतो "बघुया, काही दिवसात कळेल, चांगले झाले की वाईट".
युद्ध तुंबळ होते, आणि सगळे योद्धे मारले जातात. गावातला एकही मुलगा किंवा घोडा परत येत नाही. मात्र, शेतकर्याचा मुलगा वाचतो.
तात्पर्य हे, की आपल्या पुढे नियती काय वाढून ठेवेल हे कुणालाच माहिती नसते, तेव्हा जे घडले ते वाईट की चांगले हे लगेच ठरवता येतेच असे नाही. असो.
राजकीय गोंधळ..
राज्यातील राजकीय परिस्थिती पण युद्धजन्य होते की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. संख्याबळाचा वापर करून निर्माण झालेले आघाडी सरकारातील कुरबुरी आता निर्णायक ठरतात का असे वाटू लागले आहे.गेल्या सहा महिन्यातील भेटीगाठी, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रमाण, तिन्ही पक्षांतील समन्वयाचा अभाव, परस्पर विरोधी विचारधारा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये असलेली सुप्त राजकिय महत्त्वाकांक्षा यामुळे या सरकारवर नेहमीच एक टांगती तलवार राहिली आहे. कधी कधी विरोधकांच्या दिशेने फिरते पण कधी कधी त्यांच्या मुळावर सुद्धा येते. पेंडुलम सारखी.
बघितले तर पाशवी बहुमत असलेले हे सरकार भक्कम कामगिरी करू शकले असते, परंतु तिन्ही पक्षांचे राजकिय आणि व्यावहारिक उद्दिष्ट कमालीचे वेगवेगळे असल्याकारणाने यांचा किमान कार्यक्रम हा फक्त सरकार राहणे आहे का असा प्रश्न पडतो.
दाणं उष्ट झालं जी..
मोदीजी यांचे तीन मुख्य कार्यक्रम आहेत.
- पहिला, 2025 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर एवढी करणे.
- दुसरा भारत कॉन्ग्रेस मुक्त करणे.
- आणि तिसरा भारतात अत्याधुनिक पायाभूत व्यवस्था निर्माण करणे - बुलेट ट्रेन + मेट्रो चे जाळे निर्माण करणे हे त्यातील मोठे प्रकल्प आहेत.
या तिन्ही कार्यक्रमात महाराष्ट्राची भूमिका अव्वल राहणार आहे.
· 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 2025 पर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरचे योगदान करेल असे घोषित केले होते.
· मुंबई-अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन घोषित झाली होती, त्यात सुद्धा महाराष्ट्रातची भूमिका महत्वपूर्ण होती. 2017 पासून तत्कालिन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी एकट्या मुंबईमध्येच (MMR भागात) जवळपास 300 किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्मिती करण्याचे काम सुरू केले होते.
· महाराष्ट्र हा कॉँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिलेला आहे. तो तसे राहण्यात स्थानिक नेत्यांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण आणि पूरक राहिली आहे. तेव्हा जरभाजपाला भारताला कॉँग्रेस मुक्त करण्याचे असेल तर महाराष्ट्रात मोठी कामगिरी करावी लागेल. त्यात राज्यात संघठन वाढविणे आलेच पण राज्यकारभाराचे सूत्रे पक्षाला मिळणे सुद्धा महत्वाचे आहे.
· 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 2025 पर्यंत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरचे योगदान करेल असे घोषित केले होते.
· मुंबई-अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन घोषित झाली होती, त्यात सुद्धा महाराष्ट्रातची भूमिका महत्वपूर्ण होती. 2017 पासून तत्कालिन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी एकट्या मुंबईमध्येच (MMR भागात) जवळपास 300 किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्मिती करण्याचे काम सुरू केले होते.
राज्य प्रथम?
मध्यंतरीच्या काळात फडणवीस केंद्रात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत केंद्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस महत्वाची भूमिका बजावू शकतात, त्यामुळे फडणवीसांना केंद्रात बोलवावे असा एक सूर सुद्धा असू शकतो.
पुढील सहा महिन्यात मुंबई आणि राज्यातील इतर नऊ ते दहा शहरात महानगर पालिका निवडणुकी व्हायच्या आहेत. जवळपास चाळीस हजार कोटीचे बजेट असलेली मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पालिकेच्या जवळपास सत्तर हजार कोटीच्या ठेवी आहेत. करांच्या रूपाने देशाच्या गंगाजळीत मुंबईतून तीन लाख कोटी रुपये जातात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इतरही सामरिक बाबी आहेत.
शिवसेनेतील काही मंडळी नेहमी प्रमाणे "फटे लेकिन हटे नहीं" या विचारात असतिल. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉन्ग्रेस, "हरण्यासारखे काही नाही (nothing to lose)" या विचारात असतिल.
सत्तेचा अमरपट्टा कोणालाच मिळत नाही, पण जर कधी कुणाला मिळालाच तर कधी-कधी त्यावर काटे सुद्धा असू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि कॉंग्रेस यांनी फक्त सत्ता डोक्यात ठेवून वैचारिक अंतर्विरोध असलेली आघाडी केली, मात्र त्यामुळे कार्यकर्ता किंवा हक्काचा मतदार दुरावले जातील याची त्यांना कल्पना असली तरीही त्याकडे सोयिस्करपणे डोळेझाक करून गाडा हाकत आहे.
सत्तेचा अमरपट्टा कोणालाच मिळत नाही, पण जर कधी कुणाला मिळालाच तर कधी-कधी त्यावर काटे सुद्धा असू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि कॉंग्रेस यांनी फक्त सत्ता डोक्यात ठेवून वैचारिक अंतर्विरोध असलेली आघाडी केली, मात्र त्यामुळे कार्यकर्ता किंवा हक्काचा मतदार दुरावले जातील याची त्यांना कल्पना असली तरीही त्याकडे सोयिस्करपणे डोळेझाक करून गाडा हाकत आहे.
त्याच्याकडे बघितले तर ज्येष्ठ कवि ना. धों. महानोर यांच्या काही ओळी समर्पक वाटतात.
“उष्ट दाणं” उपयोगी पडेल का, राज्यात नवीन पात्रांसोबत पुन्हा एकदा "मैत्रीचा कोथळा" किंवा " ट्रोजन हॉर्स" (क्लीक करून वाचा) चे अंक रंगतील का?
कालाय तस्मै नमः.
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र
मार्केट
रिसर्च
विश्लेषक
आहे.
पोस्टमधील
माहिती,
आकडेवारी,
कविता,
फोटो
इंटरनेट
वरुन
साभार
घेतले
आहे.)
"मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दाणं उष्ट झालं जी"
आता हे दाणं कुणासाठी जास्त उष्ट झालं हे ज्याचे त्याने ठरवावे. येणारा काळ दाखवेल कोण “उष्ट दाणं” उपयोगी पाडून घेतो तो.दूसरे, सुरुवातीच्या कथेतील मुलगा त्याच्या नशिबाने वाचतो खरा, पण पुढे तो शेतकऱ्याचे नाव काढतो की बुडवतो हे सध्या गुलदस्त्यात राहिलेले बरे.
Comments
Post a Comment