Skip to main content

रमूया थोड़े रमीत.....

21 मार्च 2021, मुंबई 
रमूया थोड़े रमीत...
बर्‍याच दिवसांनी आज रमीचा डाव खेळलो. दहा पत्त्याची, 3-3-4, आणि जोकर नसलेली रमी! (जोकर असलेली रमी खेळणे म्हणजे मिळमिळीत मिसळ खाणे, काय असते मजा तिला?). पहिल्याच डावात मात्र गम्मत झाली, दोन- दोनच्या पाच जोड्या लागून आल्या, मग झाली ना फजिती! कुठला पत्ता सोडावा आणि कुठला ठेवावा यात गल्लत होत गेली. सामान्य माणसाला दरवेळेस दोन पैकी नेमका कुठला पत्ता टाकावा याचे जजमेंट दरवेळेस जमेलच असे नाही. अनेकदा आपण फेकलेल्या पत्त्याच्या जोडीचेच पत्ते, नेमके तो पत्ता आपण फेकल्यावर आपल्या समोर येतात!
 
नंतर विचार केला तर असे आढळते की, रमीमध्ये, सुरुवातीलाच आपल्याला सोडता येणारी काही पत्ते येणे बर्‍याचदा फायद्याचे सुद्धा असते. दहापैकी 6-7 आसपास जुळलेली आणि 2-3 सोडण्यासाठी किंवा जमले तर जमले या कॅटेगरी मधील!!त्यामुळे खेळणाऱ्याला सोपे जाते. अर्थात, काहींना ही विचारसरणी नकारात्मक वाटू शकते,असो.
 
राजकारणात पण रमीप्रमाणे, खेळता-खेळता जोड्या लागल्या तर खेळ छान जमतो. जोड्या आधीच लागून आल्या की मग कधी-कधी कठीण होऊ शकते. आता राज्यातील राजकिय परिस्थितीच बघा.
 
2019 जेव्हा सत्तास्थापनेचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळी तिन्ही पक्षांना आपापल्या मोठ्या अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात सामील करण्याची संधी होतीकॉन्ग्रेसला तश्याच कमी जागा मिळाल्या, तरीही पक्षाने बहुतांश अनुभवी लोकांना संधी दिली, काही दोन तीन मोठे चेहरे सोडले तर.राष्ट्रवादीने सुद्धा जवळपास सगळ्याच मोठ्या नेत्यांना संधी दिली. मात्र शिवसेनेने तसे नाही केले, अनेक जुन्या, अनुभवी आणि प्रस्थापित नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. तीन-चार नेते वगळला, त्या तुलनेत सेनेचे बरेच मंत्री नवीन आहेत.
 
जुन्या लागलेल्या जोड्या घ्यायचे सेनेने टाळले असावे का की हा निव्वळ योगायोग असावा हे तेच सांगू शकतात. पण जर समजून केले असेल तर, याचे कारण तीन पक्षांचे सरकार आहे म्हणुन असावे. आत्ताची परिस्थिती बघता असा प्रश्न पडतो की, हा कदाचित त्यांच्या रणनीतीचा भाग असावा का? असेलही किंबहुना नसेलही. असेल तर, हा विचार स्वयंभू आहे कि कुणी सल्ला दिला - हे ज्याचे त्यालाच ठाव
 
एकेमकांना अनुकूल नसणारी विचारधारा, आंतरिक समन्वयाचा अभावामुळे किंवा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक प्रतिष्ठेच्या संघर्षात, येणार्‍या कालखंडात आपल्याला काही बळी द्यावे लागतील तेव्हा सगळेच नेते अनुभवी आणि जुने असण्यापेक्षा, त्यातल्या त्यात नवीन, अननुभवी नेते असलेले कधीही बरे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अधिवेशनात शिवसेनेला आपल्या एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. मंत्री तसे एकदम नवीन पण नव्हते, पण सेनेच्या टॉप-लाइन मधले सुद्धा नव्हते, हेही तितकेच खरे.
 
मात्र राष्ट्रवादीवर एकदा ही वेळ आली होती, त्यातून त्यांची कोंडी वेळेवर सुटली. मात्र आता पुन्हा परिस्थिती निर्माण होतेय, कारण विरोधी पक्ष गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला असेलच, कारण मंत्री तसे ज्येष्ठ आणि आतल्या गोटातील आहे.
शेवटी काय, हलके होण्याची वेळ येते तेव्हा मोठा पत्ता टाकायला लागणे, यापेक्षा मोठी वाईट परिस्तिथी एखाद्या खेळाडूवर आली तर काय होते हे कळते. राजकिय रमी काय, आणि पत्त्याची रमी काय - नियम, रणनीति सारखेच असतात! बघुया, राजकिय पटलावर जोड्या पुन्हा जमतात का, की जमलेला डाव फुटतो?
 
जाता जाता.. 
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अस्थिरतेच्या अजून किती जवळ जाते हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईलच. पत्त्यांच्या डावासारखा हा डाव रंगतो, की पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सत्तेचे घर कोलमडून पडते हे स्पष्ट होईलच.
 
किंवा सर्कशीतील शेवटचा आणि महत्वाचा असणारा हवेतील शीडीच्या खेळात, कधी कधी एखाद्या खेळाडूचे शीडी पकडण्याचे गणित चूकते ताशी काहीशी परिस्थिति  निर्माण होते का? आणि तशी झालीचतर खाली लावलेले जाळे मजबूत आहे काहे बघणे औत्सुक्याचे ठरेल.   
 
सत्तेचा अमरपट्टा कुणालाच मिळत नाही हे मात्र खरे.  
 
एका मराठी ब्लॉग मध्ये श्री भाऊसाहेब पाटणकर यांची "पत्त्यांचा खेळ" ही कविता वाचनात आली, त्यातल्या काही ओळी
“मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे
 
आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली".
तूर्तास एवढेच
कालाय तस्मै नमः 
धनंजय मधुकर देशमुखमुंबई 
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...