Skip to main content

दीपोत्सव , तिखट+ गोड, आणि बरेच काही ....

12 नोव्हेंबर 20, मुंबई

आहे तेच, तरीही...

बर्‍याच लोकांनी कधीतरी टॉम क्रूस याचे मिशन इम्पॉसिबल (MI) नावाचे सिनेमे बघितले असतील. 1996 मध्ये सुरू झालेली आणि आज पर्यंत सहा सिनेमे असलेली ही सिरीज दर दोन-तीन वर्षात एक नवीन सिनेमा घेऊन येते. पुढच्या दोन वर्षांत MI-7 आणि MI-8 येतील.
आज पर्यंत आलेले MI सिरीजचे सहा सिनेमे, USD 828 मिलियन म्हणजे जवळपास सहा हजार कोटी रुपये (आजच्या चलनदरात मोजले तर) खर्च करून बनविले आहे. त्यांची जागतिक कमाई सुद्धा तेवढीच घसघशीत आहे, USD 3.57 बिलियन म्हणजे जवळपास 26-27,000 कोटी रुपये!!

काय आहे MI चे वैशिष्टय़? 

तसे बघायला गेले तर विशेष असे काहीच नाही. प्रत्येक MI सिनेमाची जडणघडण सारखीच असते. बहुतांश वेळी कथानक रशिया किंवा पूर्व यूरोप मध्ये असतो, आतंकवादी किंवा शस्त्रांचे तस्कर यांना काबू करण्यासाठी IMF नावाची संस्था त्यांच्या तरबेज एजेंट ईथान हंट (टॉम क्रूस) ला तीन चार सहकारी देऊन एक मोहीम आखून देते.

प्रत्येक सिनेमात एकदा तरी डुप्लिकेट चेहरा लावून समोरच्याला फसविले जाते, टॉम क्रूस शंभरच्या स्पिड ने कुठेही धावतो, हेलिकॉप्टरचा पाठलाग, हेलिकॉप्टर पडणे, बोटीत प्रवास, हंटच्या टीम मध्ये किंवा वरिष्ठांपैकी कुणी डबल एजेंट (दोन्ही कडून खेळणे) असणे, आणि शेवटी मिशन यशस्वी. यांचा क्रम पुढेमागे होऊ शकतो, पण MI सिरीजचे हे महत्वाचे घटक आहेत, आणि ते राहणारच. याला साथ देतात ते भन्नाट MI ट्यून (ट्यून तीच पण प्रत्येकवेळी इंस्ट्रूमेंट मध्ये बदल), नवनवीन इलेक्ट्रॉनिक गैजेट्स आणि भरधाव धावणार्‍या गाड्या आणि बाइकस.1996 मध्ये वायरलेस यंत्रणा लोकप्रिय आणि अमलात आलेल्या नसताना सुद्धा त्याचा भरपूर वापर करणार्‍यांपैकी एक इथान हंट आणि त्याचा चमू असावा. काळाच्या पुढे, नेहमी!!

नया नहीं है वह फिर भी... 

फारसे काहीच नावीन्य नसले तरीही प्रत्येक वेळेसचा MI थोडेफार रोमांचक कथानक, प्रेक्षणीय स्थळे, अफलातून स्टंट्स नवनवीन पद्धतीने मांडून 2 तास खिळवून ठेवण्याची किमया साध्य करतोम्हणजे असलेल्या साहित्यात जे बनवता येईल ते चांगल्या पद्धतीने बनविणे आणि सादर करायला जमणे, जेणेकरून गल्ला भरभरून वाहतो.

आमची चवच न्यारी.. 

दरवर्षी दिवाळी आली की दिवाळीचा फराळ घरोघरी केला जातो. जिन्नस बहुतांश ठरलेले असतात - चकल्या, शेव, चिवडा, अनारसे, लाडू, शंकर पाळे आणि करंजी. काही घरांत सगळे बनवतात किंवा काही ठराविक बनवितात. पण थोडक्यात, दर वर्षी, जिन्नस तेच असले तरीही त्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, आणि त्यांचा फडशा पाडला जातो. MI सारखे, फराळ करण्याची साधने हायटेक नसली तरीही त्यात प्रगती आहे. कधी-कधी एखादा जिन्नस थोड्या फार प्रमाणात फसतो, डबल एजेंट सारखं, पण तरीही त्याचा योग्य तो वापर होतोच, त्याला योग्य ती वागणूक दिली जाते.

ऑफलाइन ते ऑनलाईन... 
फराळ बनविण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरली जात असली तरीही, फराळाच्या जिन्नसांची विक्री नवनवीन पद्धतीने होते आहे. व्हॉटसप ग्रुप, टेलीग्राम, वेबसाइट, माइक्रो साइट इत्यादिचा वापर "चविष्ट फराळ तयार आहे. घरपोच पाठविला जाईल, ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था आहे " हा महत्वाचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत चोखंदळ पणे केला जातोय.

वोकल फॉर लोकल..

आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना  देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना "वोकल फॉर लोकल (स्थानिक/ भारतीय वस्तूंसाठी आग्रही)" हा संदेश आत्मसात करून त्याचे अनुसरण करण्याचे आव्हान केले.
 
या ये है... 
विलायती चॉकलेटी पेक्षा घरगुती फराळ, चिनी बनावटीच्या माळ किंवा आकाश दिव्यां एवजी बांबू निर्मित आकाश कंदिल, गोमय (गाईच्या शेणाचे) निर्मित दिवे आणि इतर बर्‍याच वस्तू ऑनलाईन, माफक दरात घरपोच डिलीवरीद्वारे ऑनलाईन  (वेबसाइट / ऍप/ व्हॉटसप ) उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ https://theswadeshbazzar.com येथे अनेक लघु आणि मध्यम उद्योग आपले प्रॉडक्टस विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. लघु आणि मध्यमउद्योग देशाच्या आर्थिकव्यवस्थेचा कणा आहेत, तेव्हा यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. केलेच पाहिजे. (छोटा पॅकेट बड़ा धमाका).

तिखट असले तरीही गोड.. 
दिवाळी म्हंटले की तिखट आणि चटपटीत खाणे आलेच. राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. काहींच्या मते, येणार्‍या काही महिन्यात राज्यात सत्तांतर अटळ आहे. त्याची पहिली पायरी लवकरच घातली जाईल. अर्थात काहींना सत्तेचा अमरपट्टा असतो आणि आपल्यालाच तो मिळाला आहे असे वाटणे साहजिक आहे (एक वर्षापूर्वी हेच सत्तेचा अमरपट्टा नसतो हे सांगत होते).
दिवाळीच्या फराळासाठी एकमेकांच्या घरी जायची प्रथा आहे. यावर्षी त्याला मुरड घालावी लागेल, कदाचित ते योग्यच असेल. तरीही, काही राजकिय मंडळींनी फराळाचे औचित्य साधून मैत्री जुळविण्याची कामगिरी फत्ते केली तर त्यात आश्चर्य ते काय!
 
फराळ काढतो वाट??
2014 च्या दिवाळीत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरीष्ठ सहकारी नितीन गडकरी यांनी एकत्र फराळाचा आस्वाद घेतला अश्या बातम्या आल्या होत्या. त्याच्या दोन चार दिवसांत फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ विधी झाला.
2019 च्या दिवाळीत सुद्धा दिवाळीफराळाचे आस्वाद सेना आणि भाजप नेते सोबत घेतील असे अपेक्षित होते. मात्र तसे झाल्याचे माहिती नाही. म्हणायला देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी निमित्त पत्रकार परिषद, 30/31 ऑक्टोबरला झाली होती आणि  त्यानंतरच तिखट पदार्थाची रेलचेल सुरू झाली असे काहींचे म्हणणे आहे. खरेतर मिठाचा खडा 24 ऑक्टोबरलाच पडला होता जेव्हा "आम्हाला सगळे पर्याय खुले आहे" असे वक्तव्य शिवसेनेकडून आले होते. असो.. 

राजकिय फटाकेबाजी..  

दिवाळीत फटाके उडवले पाहिजे किंवा नाही यावर गेल्या आठ दहा वर्षांपासून चर्चा सुरू झाली. कधी आवाजाचा त्रास होतो, तर कधी प्रदूषण होतो याकरिता तर आता त्याच्यामुळे कोरोना वाढेल या कारणाने फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या वेळेला कदाचित दिवाळी कमी आवाजाची होईल, परंतु देशभरात राजकीय फटाकेबाजी जोरदार सुरू आहे, राहणार आहे, कदाचित वाढेल सुद्धा.
 
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले  आहे, परंतु त्यांना कमीतकमी अजून 20 आमदारांची तजवीज करून ठेवावी लागणार आहे, तरच त्यांचे सरकार सुदृढ राहील.
मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये झालेल्या पोटनिवडणुकी मध्ये भाजपला निर्विवाद यश मिळाले - तेथील सरकार अजून स्थिर झाले, अधिक जोरकसपणे काम करतील.

या यशामुळे भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असेलच. विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागाने भाजपला बिहारमध्ये मिळालेले यश पक्षाला आणि फडणवीस यांस व्यक्तिगत अधिक आत्मविश्वास देऊन जाईल. मध्यप्रदेश मधील 27 जागांपैकी 19 जागा काढून "इनकमिंग झालेल्या नेत्यांना" भाजप व्यवस्थित पुनर्वसित करते असा संदेश महाराष्ट्रातील राजकारण्यांना गेला तर त्यात वावगे नसावे. पक्षाचा हा विजय बघून राज्यातील स्थानिक भाजप नेते किती सक्रिय होतात हे बघणे महत्वाचे.

दीपोत्सव प्रकाशपर्वाचा...  
आज वसूबारस. आजपासून दिवाळसणाला सुरुवात होते. दीवा लावुन तिमीरा (दुःख, अज्ञान, अंधकार) पासून तेजाकडे (ज्ञान, मोक्ष, सुख, आनंद) नेण्याचा पर्व , दीपोत्सव सुरू होतो.

"दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करुं तिची प्रार्थनाशुंभ करोती कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या दिसतई पाऊलखुणा
या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा 
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना."

दीपोत्सवाच्या आणि लक्ष्मीपूजेच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली.

- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई 
(लेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. वरील पोस्टसाठी लागणारी माहिती (फोटो, आकड़े, कविता) इंटरटनेट वरुन साभार गोळा करण्यात आली .)

Comments

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...