Skip to main content

राजकीय पटलावरील विदूषक / जोकर

10 जून 20, Mumbai

राजकीय पटलावरील विदूषक / जोकर

परवा भाजपने "महाराष्ट्र संवाद रैली" आयोजित केली होती - अर्थात ऑनलाईन. या कार्यक्रमात गृहमंत्री श्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे असे म्हंटले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. महाआघाडी कडून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात महत्वाची म्हणजे, ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांची - "महाराष्ट्र सरकारमध्ये विदूषकाची गरज आहे". अर्थात, हे सगळे एकमेकांवर राजकिय कोटी करण्यासारखे असले तरी त्यात काही खोटे नाही.

आपण फक्त खेळ बदलला की तोच विदुषक, म्हणजे जोकर, अत्यंत महत्वपूर्ण होऊन जातो. भाव खातो. सर्कस बघण्याएवजी जर आपण पत्त्याची रमी खेळली तर?
रमी मध्ये जोकराला अनन्य साधारण महत्व असते, कारण तो कुठलीही अपूर्ण जोडी पूर्ण करू शकतो. अर्थात काही गंभीर खेळाडू, जोकरा बद्दल नियम लावुन खेळतात - जसे कुठल्या जोडीत तो वापरु शकतो, कितवा नंबरचा तो पत्ता असू शकतो. खरे तर, गंभीरतेने रमी खेळणाऱ्यांनी जोकरचा वापरच करू नए, म्हणजे, "Pure" जोडी होते. खेळ चांगला होतो. जोकर कधी असतो कधी नसतो. तो असला की खेळातील मजा निघून जाते. निष्णातपणा दाखविता येत नाही. 

कॅरम मध्ये जसा "थम" सहसा खेळला जात नाही त्याच पद्धतीने जोकर हद्दपार करून रमीचा डाव खेळणे. असो.

राजकारणातसुद्धा जोकर असतात. असावेच लागतात. मनोरंजन करणारे तर असतातच, परंतु महत्वाचे असतात ते जोड्या पूर्ण करणारे. काही त्यांना "पपलू (go to, conduit)" असेही म्हणतात.

जर श्री पवार यांसारखी ज्येष्ठ राजकारणी व्यक्ति, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जोकर (जोड्या पूर्ण करणार्‍या) ची कमतरता आहे असे म्हणत असेल तर ते महत्वपूर्ण आहे. विशेषतः जेव्हा माध्यमातून तिन्ही पक्षात समन्वय नसल्याच्या बातम्या दर दोन-चार दिवसांनी झळकतात तेव्हा.

असे एक चित्र निर्माण झाले आहे की महा आघाडीतील तिन्ही पक्षांत प्रचंड बेबनाव आहे, संघर्ष आहे, प्रशासकीय अधिकार्‍यांना मंत्र्यांना सोबत घेऊन काम न केल्यामुळे डटावल्याच्या बातम्या येतात आहेत. अर्थात यातील बर्‍याच बातम्या रंगवून सांगितल्या जात असतिल. काही जाणून बुजून पेरल्या सुद्धा असतिल - कवर फायरिंग करतात तश्या, जेणेकरून जनतेचे, माध्यमांचे किंवा विरोधी पक्षाचे लक्ष दुसरीकडे जाईल. कुछ भी हो सकता है.

राजकारणातील "जोकर (ज्याला पपलू सुद्धा म्हणतात)"
विनोदाचा भाग सोडून, राजकिय विषयक बोलुया. राजकीय जोकर म्हणजे, नैसर्गिकरित्या एकमेकांसोबत ना जाणार्‍या राजकिय पक्षांना सोबत आणण्याची  किमया करणारे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे या लिखाणातील राजकीय जोकर ही संज्ञा (उपाधि / शब्द उपयोग) केवळ त्याचदृष्टीने बघावी. यात कुणालाही कमी लेखण्याचा किंवा त्यांची थट्टा करण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न नाही.

स्वयंभूरूप
हे राजकीय जोकर कुठूनही कधीही उगवू शकतात. अगदी सरपंचापासून तर राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात भूमिका बजावतात. काही राजकारणी पक्षच नेहमी पपलूच्या भूमिकेत असतात. आयुष्यभर. अर्थात, या पपलूचे हितसंबंध जो पर्यंत राखले जातात. काही पपलू, आपण किंगमेकर आहोत असा आभास निर्माण करतात, जरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यमर्यादा किंवा किम्मत फार कमी असेल तरीही (शोले सिनेमामध्ये , जसा लाकडी तुकड्याचा बंदूक म्हणुन आव आणला जातो तसा, अर्थात याला गंभीरतेने घेणारा सुद्धा एक मूर्ख "अंग्रेजो के ज़माने का जेलर" असावा लागतो).

अनेक प्रादेशिक पक्ष, किंवा नेते, ही भूमिका जोरकसपणे पार पाडतात. त्यासाठी त्यांना नेहमी सरकार मध्ये राहणे गरजेचे असते असेही नाही. उदाहरणार्थ, जेव्हा कधी संसदेत किंवा विधीमंडळात एखादा प्रस्ताव पारित करायचा असेल किंवा होऊ नसेल द्यायचा, तेव्हा हे, राजकीय जोकर (पत्यांतील पपलू) आपली भूमिका बजावतात. कुठल्याही बाजूने, विजय त्यांचाच असतो. शेअर मार्केट मधील शॉर्टटर्म ट्रेडिंग सारखे असते हे. काम खत्म, खेल खत्म.

या भूमिकेत असलेले अनेक राजकिय नेते, पक्ष आपण बघितले आहेत. अजूनही बघत आहोत. प्रत्येक राजकिय पक्षात सुद्धा राजकिय जोकर (पपलू), अनेकदा पक्षांतर्गत वादामध्ये भूमिका निभावतात. जोड्या जुळवून आणतात.

अर्थात, पाहिजे त्याला आणि पाहिजे तेव्हा जोकर मिळवून देणे हे सुद्धा मोठे काम असते. त्याला अनेक विशेषगुण लागतात - अर्थकारण करता येणे हा गुण असावाच लागतो, परंतु त्याहूनही अनेकदा मनुष्यकारण म्हणजे नेटवर्किंग हा गुण आधी असायला हवा. त्यासाठी अनेकदा नेहमी चहापेक्षाही गरम असलेल्या केटलीला पुजावे लागते, अर्थात आजकाल सगळीकडे पुजारी असतातच. राजकीय लोकच जोड्या लावून देतात असेच काही गरजेचे नाही. कधी-कधी कलाकार, संपादक, पत्रकार, आध्यात्मिक गुरु, व्यापारी किंवा राजकीय विश्लेषक, कन्सल्टंट हे सुद्धा पडद्याआड किंवा "सूर्यप्रकाशात उजळ माथ्याने" राजकिय जोकरची (पपलूची) भूमिका बजावतात. जोड्या घडवून आणतात.

राजकीय जोकर, आपले सगळ्या पक्षांत मित्र आहेत असे सतत भासवत असतात. तशी गरजच असते, नाहितर त्यांचे अस्तिव धोक्यात येते

असे म्हंटले जाते, भारताच्या राजकिय पटलावर शरदराव पवार यांचे जेवढे मित्र असतिल तेवढे कुणाचेच नसावेत. अर्थात यात अतिशयोक्ती असू सुद्धा शकते. परंतु, आजकाल प्रत्येक मोठ्या राजकिय पक्षात "मैत्रीकार" असतात. असावेच लागतात. एक काळ असा होता की राजकीय मतभेद असले तर एक प्रकारचा अबोला राहायचा. आता काळ बदलला आहे. राजकिय मतभेद वेगळे, व्यक्तिगत मैत्री वेगळी असे मानणारे व्यवसायिक राजकारणी आजकाल सगळीकडे दिसतात. त्याच व्यक्तिगत मैत्रीचा हात पुढे करून राजकिय गळाभेटी घडवितात, नवीन सूत्र तयार करण्यात हातभार लावतात.

राजकारणात मैत्री आणि शत्रुता कायम राहत नसली तरी, एक फॉल्ट लाइन (भ्रंश / दोष रेषा) नेहमी राहते. याच रेषेचा वापर करून, काही चाणाक्ष राजकारणी तिला अंत:प्रवाहात परिवर्तीत करतात, आणि त्या प्रवाहाला वेग देऊन साधायचे ते साधतात. आपल्याला पाहिजे तशी भाकरी फिरवतात.

महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती स्थिर आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे होईल. भाजपला, आणि विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेली ही जुळवाजुळव आहे. त्यात बराच अंतर्विरोध आहे. हा अंतर्विरोध फक्त तीन पक्षांमध्ये आहे असेही नाही, या तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याच पक्षाच्या भूमिकवरुन अंतर्विरोध आढळतो.

काही राजकीय विश्लेषकांच्या भाकितानुसार या अंतर्विरोधामुळे महाराष्ट्रात लवकरच राजकीय बदल घडतील. असे म्हंटले जातेय. परंतु, हे जर व्हायचे असेल तर महाराष्ट्रातील राजकिय जोकरांना (पपलू) जागृत करण्याची हीच ती वेळ. मात्र यावेळी ह्यांची भूमिका दूरगामी असावी लागेल, जेणेकरून महाराष्ट्रात पुढचे चार वर्षे राजकिय स्थैर्यता नांदायलाच हवी. वैश्विक कोरोना महामारीमुळे होत असलेल्या जिवित, आर्थिक आणि मानसिक हानीमुळे महाराष्ट्राच्या बारा कोटी च्या भल्यासाठी, राज्यात राजकिय स्थैर्यता अत्यंत गरजेची आहे.

कुणीतरी म्हंटले आहे -
"ताश का जोकर और अपनों की ठोकर
अक्सर जिंदगी की बाजी घुमा देते है'

अर्थात जोकर हा नेहमीच गरजेचा असतो असेही नाही. काही गंभीर खेळाडूंना त्यांच्या कौशल्यावर भरोसा असतो. आपल्याकडे जोकर नसतानाही जिंकण्याचे कसब त्यांच्याकडे असते. कदाचित त्यांच्या मनात हे असेल-


"खेल ताश का हो या जिंदगी का,
अपना ईक्का तब ही दिखाना जब सामने बादशाह हो! "

येणारा काळच दाखवेल की महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर कोण एक्का, बादशहा किंवा जोकर म्हणुन पुढे येतो ते.

शुभम भवतु!
धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
Dhan1011@gmail.com 

Comments

  1. महाराष्ट्रात सत्तांत्तर होणे शक्य नाही कारण शीवसेनेला माहिती आहे की जर आता ते सत्तेतुन बाहेर फेकल्या गेले तर मतदार त्यांना चांगला धडा शीकवतील.अन त्याकरिता त्यांनी हिंदुत्वादि आपली इमेज पूर्ण बदललेली आहे.सत्तेसाठी कॅांग्रेस अन राष्टवादि कोणतीहि तडजोड मान्य करतील.
    राहिला राहिला प्रश्ण सर्कस चा तर संजय राऊत अन स्वतः पवारांनी च हे कबूल केल आहे की अनेक पक्षाचे सरकार चालवणे म्हणजे सर्कस चालवीणे सारखच आहे.परंतु एका जेष्ठ नेत्याने एका जेष्ठ नेत्यांना विदूषक म्हणने योग्य नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

TrendSpotting : New and Rising - Pickleball

20 November 2022, Mumbai Let’s have a ball, Pickleball! A school friend of mine recently got transferred from Kolkata to Mumbai. Being a fitness-oriented person, he asked me if there are any good recreation (sports) facilities nearby. Knowing that he got an apartment in the heart of Vile Parle East, I was quick to recommend Prabodhankar Thackeray Krida Sankul (PTKS) – an obvious choice for anyone living in the western suburbs to relax, unwind, train and play!   While he was thrilled to see the Olympic size swimming pool, he got curious about a game that a group of boys were playing in the open area. While the game looked like lawn tennis, but it was not. It appeared to be an easy yet fitness-oriented game to him. When I told him that it is called “ Pickleball” he was like I was kidding! It was natural, A commoner may be amused to hear “Pickleball” being name of a sport! Well, that it is true.   I then took up the opportunity to introduce him to some trainers of the...

उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची!

23 एप्रिल 23, मुंबई  उद्योगांवर बोलू काही - विदर्भात उद्योगांची भरारी गरजेची! पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये 'मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क' घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीसह गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक व उत्तर प्रदेश याठिकाणी पीएम मित्रा योजनेअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सातही प्रकल्पांसाठी चार हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे सदर प्रकल्प होणार आहे, जवळपास ३ लाख लोकांना रोजगार त्‍यातून मिळणार आहे.    ‘पाच एफ’ अर्थात ‘फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन’ याअंतर्गत सदर प्रकल्प उभारले जाणार आहेत. सदर प्रकल्पासाठी केंद्र सरकार ७०० कोटी खर्च करणार असून या पार्कचे मार्केटिंग केंद्र सरकार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहे. यातूनच अनेक मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड अमरावतीला येणार असल्याची माहिती आहे. ...

राजकीय आरसा - श्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै 2022, मुंबई राजकीय आरसा – श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर निर्णायक बाजू घेऊन त्यांचे राजकिय आरक्षण बहाल केले. गेले अडीच-तीन वर्ष फोफावलेल्या अनिश्चिततेला पूर्णविराम मिळेल असे दिसतेय. मागच्या जुलै मध्ये तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी सदनात घोषणा केली होती की त्यांचे सरकार आले तर तीन ते चार महिन्यात हे आरक्षण बहाल करण्यात येईल असे प्रयत्न करू. काळाची किमया बघा, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय आला. पदग्रहण केल्यापासून दोन-तीन आठवड्यात त्यांनी या विषयी निर्णायक हालचाली केल्या असे म्हंटले जाते. असो, राज्यात राजकिय स्थैर्यासाठी हे होणे आवश्यक होते. तसे बघितले गेले तर, राज्यात स्थैर्य येईल असे दर्शवणारी गेल्या चार आठवड्यात घडलेली ही एकमेव घटना नाही. याची नांदी जून मध्ये घडलेल्या राज्यसभा निवडणुकीत लागली होती. भाजपचे श्री धनंजय महाडिक यांनी भाजप आणि मित्र पक्षांकडे संख्याबळ नसतांना अटीतटीच्या लढतीत तिसरी जागा जिंकली. त्या वेळेस महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप आला होता, त्यातील...